Experience reading like never before
Sign in to continue reading.
"It was a wonderful experience interacting with you and appreciate the way you have planned and executed the whole publication process within the agreed timelines.”
Subrat SaurabhAuthor of Kuch Woh PalAchievements
बेहद्द:- ह्या पुस्तकात 2 कथा आहेत ..आपल्यावर करत असलेल्या निर्भेळ आणि निरपेक्ष प्रेमाच्या..आपण एखाद्यावर मनापासून प्रेम करत असलो की त्याचे सगळेच आपल्याला आवडते आणि मग सुरू होतो
बेहद्द:- ह्या पुस्तकात 2 कथा आहेत ..आपल्यावर करत असलेल्या निर्भेळ आणि निरपेक्ष प्रेमाच्या..आपण एखाद्यावर मनापासून प्रेम करत असलो की त्याचे सगळेच आपल्याला आवडते आणि मग सुरू होतो आपल्या आयुष्यातील उत्कंठावर्धक आणि रोमांचित करून देणारा अनुभव. हा अनुभव घेत असताना अनेक वेगवेगळ्या गोष्टींना सामोरे जावे लागते..कधी पारडे आपल्या बाजूने असते तर कधी दुसऱ्याच्या...अर्थातच प्रेम किती भक्कम आहे याचा प्रत्यय आपल्याला वेळोवेळी येतो...
तरल, सुंदर आणि भावस्पर्शी 2 प्रेम कथा नक्की वाचा!
'सातत्यता'.. सातत्यता म्हणजे सतत...आपल्या मानवी मेंदूचे काम सुद्धा सतत चालू असते आणि त्यात असतात विचार.
सातत्याने येणारे विचार. न थांबता येणारे विचार. काही सकारात्मक तर काह
'सातत्यता'.. सातत्यता म्हणजे सतत...आपल्या मानवी मेंदूचे काम सुद्धा सतत चालू असते आणि त्यात असतात विचार.
सातत्याने येणारे विचार. न थांबता येणारे विचार. काही सकारात्मक तर काही नकोसे...खरं तर माणसाचे मन हे अफाट ताकदीचे! त्यातले विचार जर आपल्याला नीट सांभाळता आले तर जीवन जगण्याची कला फार उत्तम पध्दतीने अनुभवता येते.
मी समुपदेशन करताना वेगवेगळ्या परिस्थिती आणि अगणित प्रश्नांना सामोरे जात असतो, त्यातुन मला जाणवते ते म्हणजे प्रत्येकाच्या मनात असणारे असंख्य भाव! या भावनाच माणसाला खूप काही गोष्टी शिकवत असतात. या भावना जबरदस्त तरल आणि तेवढ्याच सक्षम असतात. भावना, विचार आणि स्व संवाद या सगळ्या एकाच नाण्याच्या बाजू..मात्र यानंतर येणाऱ्या प्रतिक्रिया ह्या प्रत्येकाच्या वेगवेगळ्या असू शकतात..या प्रतिक्रिया हाताळायला त्यांना योग्य दिशा देण्याची आवश्यकता असते.
हा कथासंग्रह सुद्धा समुपदेशन करताना मला आलेल्या अनुभव आणि त्यातल्या प्रतिक्रिया यांचे कथा स्वरूप आहे. यातले बरेच अनुभव हे आपल्याला कसे वागायचे आहे हे शिकवून जातात तर काही गोष्टी मनस्वी विचार करायला भाग पडतात.
आपल्या जीवनाचा मूळ उद्देश हा सतत आनंदी राहणे आहे हे मी मानतो आणि म्हणूनच हा उद्देश जगताना आणि काही परिस्थितीला सामोरे जाताना आपण सातत्याने योग्य प्रयत्न करणे गरजेचे असते. ही 'सातत्यता' तुम्हाला या पुस्तकात सुद्धा वाचायला मिळेल ही आशा व्यक्त करतो.
आपले जीवन हे अनेक प्रसंगांनी भरलेले असते. काही प्रसंग आपल्याला कसे जगायचे हे तर काही प्रसंग चार मोलाच्या गोष्टी शिकवून जातात. सतत काहीतरी घडत राहणे म्हणजे आपले जीवन न थांबता चा
आपले जीवन हे अनेक प्रसंगांनी भरलेले असते. काही प्रसंग आपल्याला कसे जगायचे हे तर काही प्रसंग चार मोलाच्या गोष्टी शिकवून जातात. सतत काहीतरी घडत राहणे म्हणजे आपले जीवन न थांबता चालू आहे असे मानायचे. आजूबाजूला घडलेल्या गोष्टींना जर कथास्वरूप मिळाले तर त्यातून आपण बोध घेऊ शकतो आणि सहजतेने जीवनाला सामोरे जाऊ शकतो...याचेच मूर्त स्वरूप म्हणजे.. ही अविरतता...आपला जीवनाकडे पाहायचा दृष्टिकोन!
Are you sure you want to close this?
You might lose all unsaved changes.
The items in your Cart will be deleted, click ok to proceed.