Experience reading like never before
Sign in to continue reading.
Discover and read thousands of books from independent authors across India
Visit the bookstore"It was a wonderful experience interacting with you and appreciate the way you have planned and executed the whole publication process within the agreed timelines.”
Subrat SaurabhAuthor of Kuch Woh Pal
सहा कथांचा संच असलेला हा भयकथांचा संग्रह एका वेगळ्याच शैलीची छाप मनावर सोडुन जातो. भयकथांमध्ये असणारी बिभत्स , भडक, आक्राळविक्राळ आणि उगीच उब आणणारी रेंगाळणारी वर्णने ट
सहा कथांचा संच असलेला हा भयकथांचा संग्रह एका वेगळ्याच शैलीची छाप मनावर सोडुन जातो. भयकथांमध्ये असणारी बिभत्स , भडक, आक्राळविक्राळ आणि उगीच उब आणणारी रेंगाळणारी वर्णने टाळुन एका वेगळ्याच शैलीचा लेखकाकाने दिलेला प्रत्यय वाखाणण्याजोगा आहे. कथांमधीलतील प्रत्येक प्रसंग भावनांना हेलकावा देणारा आहे. प्रत्येक कथा एका लयीत सुरु होते, आणि वाचक त्यात कधी गुरफटुन जातो हे कळतच नाही आणि तीच लय शेवटपर्यंत टिकवत लेखक वाचकाला भितीच्या गुहेत अलगद घेवुन जातो. प्रत्येक कथेचा नायक काहितरी भयानक भितीच्या सावटाखालुन जाणार आहे हे प्रत्येक कथेच्या सुरुवातीपासुनच जाणवते, पण शेवटपर्यंत त्या भितीची प्रचीती नायकाला न येता तो त्या भितीच्या जगात शिरकाव करतो. आणि मग त्यातुन सुटका करताना त्याच धैर्य , मुल्य, संस्कार त्याच्या कसे कामाला येतात हे सगळ लेखकाने अतिशय अफलातुन पद्धतीने ऐकमेकांत गुंफल आहे . साधारणपणे भयकथांना अंधविश्वास, अनाकलनीय गोष्टी आणि विस्मयतेची किनार असतेच , पण ज्या पद्धतीने लेखकाने वर्णने केली आहेत ते पहाता प्रत्येकाने वैयक्तिक आयुष्यात या घटनांचा प्रत्यक्ष किंवा अशा ऐकीव गोष्टींचा हवाला कधीना कधी घेतल्याच नक्कीच जाणवेल. खरच अप्रतिम कथासंग्रह . कधीकधी पचतारांकित हाॕटेल मधल सुवासिक जेवणसुद्धा पचायला जड असेल आणि जास्त खाल्ल तर पोटाला त्रासही देईल. पण तोच उघड्या माळरानातला , शेतातला रानमेवा कितीही खाल्ला तरी पोट भरतच नाही , यातल्या सर्व कथा अगदी तशाच रानमेव्या सारख्या, संपवुन पुन्हा-पुन्हा वाचल्या तरी मन भरत नाही.
हा सर्व कथापाट लिहुन काढण्यामागे कारण ही तसच आहे , कधी-कधी सामान्य असणाऱ्या अनेक गोष्टी आपण आपल्या दैनंदिन जीवनात करत असतो , पण पुढे जाउन त्याच गोष्टी आपल्याल
हा सर्व कथापाट लिहुन काढण्यामागे कारण ही तसच आहे , कधी-कधी सामान्य असणाऱ्या अनेक गोष्टी आपण आपल्या दैनंदिन जीवनात करत असतो , पण पुढे जाउन त्याच गोष्टी आपल्याला आपल्या जीवनाच्या सर्वोच्च स्थानी घेवुन जातात. नावलौकिक ,पैसा , प्रसिद्धी सर्वकाही मिळवुन देतात. तर तुम्हा सर्व वाचकांना विनंती की तुम्हीदेखील स्वतःच्या दिनक्रमाला क्षुल्लक समजत असाल , तुमची एखादी चांगली सवय तुम्हाला अगदीच सर्वसामान्य वाटत असेल तर मग असे समजु नका, कारण तीच सवय कदाचित येणाऱ्या काळात यशस्वीतेची सुंगधी फुले जडवलेली माळ तुमच्या गळ्यात घालणार आहे. फक्त रोजचा रियाज , सराव , अभ्यास चालु ठेवा. कदाचित श्रीपतमहाराजांची ही जीवनकहानी तुम्हाला यामागचा सर्व सार उलगडुन दाखवेल आणि म्हणुच मी त्यांचा अनुभव लिहता झालो , कदाचित तुम्हाला प्रोहत्सान मिळावे हाच एकमेव उद्देश.
Are you sure you want to close this?
You might lose all unsaved changes.
The items in your Cart will be deleted, click ok to proceed.