You cannot edit this Postr after publishing. Are you sure you want to Publish?
Experience reading like never before
Sign in to continue reading.
10 Years of Celebrating Indie Authors
"It was a wonderful experience interacting with you and appreciate the way you have planned and executed the whole publication process within the agreed timelines.”
Subrat SaurabhAuthor of Kuch Woh Palप्रत्येक व्यक्ती दररोज जीवनातील अनेक बऱ्या वाईट प्रसंगांना सामोरे जात असतो. अश्याच प्रसंगांना सामोरे जातांना येणारे विविधरंगी अनुभव मानवाला बरेच काही शिकवून जातात व पुढील आयुष्याचे नियोजन करण्यास समर्थ असे बळ देऊन आठवण म्हणून भावना स्वरुपात सदैव मनात शिरकाव करून वावरत असतात. अश्या बहुरंगी आठवणींना कवियत्री राणी अमोल मोरे त्या-त्या वेळी काव्यबद्ध करीत गेल्या व त्यांचा तब्बल ७५ कवितांचा “रानमोती” काव्यसंग्रह उदयास आला. त्यांनी आपल्या काव्यसंग्रहास दहा विभागात विभागले असून त्यामध्ये प्रार्थनीय, सृष्टी, कंठ्स्वर, अंतर्मन, जीवनराग, शिवारवीर, बालमन, वंदनीय, अनाठाई व सहज यांचा समावेश आहे. त्यामुळे प्रत्येक विभागातील कविता वाचतांना नजरेपुढे स्पष्ट चित्र निर्माण करून जाते.
राणी अमोल मोरे
सौ. राणी अमोल मोरे यांनी डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठातून एम.एस.सी. (कृषी) पदवी ग्रहण केलेली आहे. विदर्भ पर्यटनावर आधारित त्यांनी काव्यबद्ध केलेले "वऱ्हाड वारं" काव्यांकन सर्वश्रुत असून त्यांना वेगळे नावलौकिक मिळवून देणारे ठरले. त्यांनी विदर्भातील शेतकऱ्यांच्या समस्यांबाबत शोधनिबंधाच्या अनुषंगाने केलेले कार्य उल्लेखनीय आहे. त्यांचे तरुणांनी राजकारणात का यावे, विदर्भातील कोरडवाहू शेती आणि मानसिकता, मुंबई ते मुंगळा, सत्ताधीश आणि कार्यकर्ता, तुम्हीच आहात सर्व..! इत्यादी लिखाण प्रचलित आहे.
The items in your Cart will be deleted, click ok to proceed.