You cannot edit this Postr after publishing. Are you sure you want to Publish?
Experience reading like never before
Sign in to continue reading.
Discover and read thousands of books from independent authors across India
Visit the bookstore"It was a wonderful experience interacting with you and appreciate the way you have planned and executed the whole publication process within the agreed timelines.”
Subrat SaurabhAuthor of Kuch Woh Palप्रत्येक व्यक्ती दररोज जीवनातील अनेक बऱ्या वाईट प्रसंगांना सामोरे जात असतो. अश्याच प्रसंगांना सामोरे जातांना येणारे विविधरंगी अनुभव मानवाला बरेच काही शिकवून जातात व पुढील आयुष्याचे नियोजन करण्यास समर्थ असे बळ देऊन आठवण म्हणून भावना स्वरुपात सदैव मनात शिरकाव करून वावरत असतात. अश्या बहुरंगी आठवणींना कवियत्री राणी अमोल मोरे त्या-त्या वेळी काव्यबद्ध करीत गेल्या व त्यांचा तब्बल ७५ कवितांचा “रानमोती” काव्यसंग्रह उदयास आला. त्यांनी आपल्या काव्यसंग्रहास दहा विभागात विभागले असून त्यामध्ये प्रार्थनीय, सृष्टी, कंठ्स्वर, अंतर्मन, जीवनराग, शिवारवीर, बालमन, वंदनीय, अनाठाई व सहज यांचा समावेश आहे. त्यामुळे प्रत्येक विभागातील कविता वाचतांना नजरेपुढे स्पष्ट चित्र निर्माण करून जाते.
राणी अमोल मोरे
राणीजी यांचे मराठी आणि हिंदी साहित्य क्षेत्रांसह कृषी आणि सामाजिक क्षेत्रात मोठे योगदान आहे. त्यांच्या विदर्भ पर्यटनावर आधारित 'वऱ्हाड वारं' या काव्यांकनासाठी त्यांना 'विदर्भ गौरव' आणि 'समाज भूषण' पुरस्कार मिळालेले आहेत. त्यांच्या 'रानमोती' या काव्यसंग्रहाला मराठी साहित्य मंडळाचा 'साहित्य भूषण पुरस्कार' देखील प्राप्त आहे. राणीजी त्यांच्या 'रानमोती ब्लॉग'मुळे 'रानमोती' या नावानेही प्रसिद्ध आहेत. नुकताच प्रकाशित झालेला त्यांचा 'जडोंतक' हिंदी कवितासंग्रह हिंदी साहित्यप्रेमींना भुरळ घालत आहे.
The items in your Cart will be deleted, click ok to proceed.