फक्त भारतीयांचेच नव्हे तर संपूर्ण जगातील जवळपास साडे आठ अब्ज लोकांचे पूर्वज कधीतरी फक्त आफ्रिकेत उत्क्रांत झाले आणि वेगवेगळ्या कालखंडामध्ये जगभर पसरले. आफ्रिकेत उत्क्रांत झालेल्या बुद्धिमान मानवाच्या काही टोड्या साधारणता ५०-६५ हजार वर्षांपूर्वी आफ्रिकेतून बाहेर पडून पश्चिम आशिया मार्गे दक्षिण आशिया म्हणजेच भारतात पोहचल्या. त्या नंतरच्या साधरणता ९-ते १० हजार वर्षांपूर्वी इराणच्या झाग्रोस पर्वतीय भागातून झालेल्या स्थलांतरातून भारतात आलेल्या आणि नन्तरच्या काळात ३-४ हजार वर्षांपूर्वी युरेशिया च्या गवताळ प्रदेशातून स्थलांतरित झालेल्या या तीनही प्राचीन पूर्वजांचे आजचे भारतीय हे आनुवंशिक अपत्ये आहेत. ५०-६५ हजार वर्षांपूर्वी सुरु झालेल्या या प्रवासाचा साक्षीदार सर्वांच्याच पेशीत डी. एन.ए. च्या रुपात सर्वांच्या रक्तात आहे. आजच्या लोकसंख्येचे आनुवंशिक विश्लेषण झाल्यानी आणि गेल्या वीस वर्षांत प्राचीन मानवांच्या अवशेषांमधील डी. एन.ए. वेगळे करून त्याचे विश्लेषण करण्याचे अत्याधुनिक तंत्रज्ञान अवगत झाल्याने काही विवादास्पद आणि पुरातात्त्विक गहन प्रश्नांची उतरे शोधण्यात आली आहेत. उदाहरणार्थ:
- आर्य बाहेरून आले कि इथलेच?
- आज जगात बोलल्या जाणाऱ्या इंडो- युरोपीयन भाषा कुळाची उत्पती कुठे झाली?
- सिंधू संस्कृतीमधील लोकं कोण होती?
- सिंधू संस्कृतीमधील राखीगडी येथील एकमेक अवशेषातील डी. एन.ए. काय सांगतोय?
- भारतात जातीव्यवस्था कधी सुरु झाली ?
- आजचे भारतीय नेमके कोणत्या वंशावळी तील आहेत ?
या सर्व प्रश्नांची उतरे आधुनिक मालेक्युलर बायोलाजी नि शोधून काढली आहेत...परंतु ती किचकट अस्या तांत्रिक आणि वैज्ञानिक संशोधनलेखांच्या स्वरुपात असल्यामुळे सर्वसामान्य वाचकापर्यंत पोहचली नाहीत. म्हणून याबाबत अगदी अद्ययावत म्हणजे २०२५ पर्यंत झालेल्या संशोधनाचा मनोरंजक प्रवास आपल्या करिता या पुस्तकाच्या माध्यमातून समोर आणला गेलाय...