हे पुस्तक अपेक्षांच्या जंगलात अडकलेल्या स्त्रियांच्या वास्तविक जीवनातील कथा सांगते. मुली, बहिणी, सून, आई इत्यादी नात्यांवर पाडल्या जाणार्या दबावामुळे, खूप समस्या उद्भवतात. या जगामध्ये कोणतीही स्त्री समाजाच्या कठोर परिस्थितीशिवाय जगली नाही.
या कथा त्यांच्या वेदनादायक अनुभवांबद्दल बोलतील आणि अखेरीस त्यांच्या अमर्याद बलिदानासाठी आवाज उठवतील.
हे निर्बंध आणि क्रूर वागणूक, आयुष्याची गुणवत्ता, शांतता आणि पुरोगामी मानसिकतेमध्ये व्यत्यय आणतात. आयुष्याच्या वैयक्तिक, सामाजिक आणि करिअरच्या पैलूंमध्ये शेवटी समस्या निर्माण होतात. यामुळे वैयक्तिक प्रगती होण्यास मदत होते का? नाही! हे केवळ अविस्मरणीय दुःख आणि नैराश्य आणते. हे प्रसंग आपल्या स्वाभिमान आणि आत्मविश्वासावर गदा आणतात.
मग आपण का बदलत नाही? काही सोपे उपाय, या समस्या स्पष्टपणे सोडवू शकतात आणि असंख्य आयुष्य जगण्यायोग्य बनवू शकतात. बदलत्या युगानुसार, जीवनशैली आणि मानसिकता बदलून, व्यापक मनाने स्वीकारली पाहिजे. या पुस्तकात प्रत्येक कथेत, उपाययोजना ही दिल्या आहेत, जी प्रत्येक व्यक्तीला फक्त भावनाप्रधान न करता, सुज्ञपणे वागण्यास मदत करेल.
आयुष्यातील अनावश्यक अंधकारमय घटना व मानसिक आजार टाळण्यासाठी, कृपया हे पुस्तक विस्तृत दृष्टीकोनाने वाचा व आयुष्य वाचवा.
हे कोणत्याही स्त्रियांच्या सामाजिक स्तरावर आधारित नाही. या पुस्तकाचे मुख्य उद्दिष्ट आहे, सामाजिक जागरूकता निर्माण करणे आणि सर्व जीवन सुखी करणे.