सौ माधवी दत्तात्रय हरदास, एक गृहिणी जीला वाचनाची अत्यंत आवड आहे, ह्याच आवडीतून निर्माण झाला लेखनाचा छंद ज्यातून जन्माला आल्यात काही उत्कृष्ट कविता ज्या पुस्तक रूपात वाचकांच्या समक्ष येत आहेत.
सौ ऋतुजा अनिरुद्ध जोशी, व्यवसायाने आहार तज्ज्ञ असलेल्या ऋतुजा वृत्तीनं कवी मन जोपासणाऱ्या एक कवियत्री आहेत, पुर्वाश्रमी नागपूर इथे वास्तव्यास असलेल्या ऋतुजा सध्या बंगरूळ येथे वास्तव्यास आहेत.
राहुल दत्तात्रय हरदास, पर्वतारोहणाच्या आवडी मुळे निसर्गात रमण्याची संधी मिळाल्याने मनातील भावनांना वाट करून देण्याचे सौभाग्य मिळाले आणि त्याच्या कविता झाल्या त्याच काही कविता ह्या पुस्तकात घेतल्या आहेत.