विवध विषयांवरील कविता या कविता संग्रहात समाविष्ट करण्यात आलेल्या आहेत. कवियत्री स्वाती कोरे या स्वप्न बळीराजाचे या कवितेतून शेतकऱ्याच्या जीवनात प्रकाश टाकतात. तर कवियत्री देविका या स्त्री भ्रूणहत्या या कवितेतून एक सामाजिक संदेश देऊन जातात. सोबतच कवियत्री अनुया या हो नाही या कवितेतून आपल्याला आयुष्यात ठाम कसे राहावे हे शिकवून जातात. तसेच कवियत्री वर्षा, कवियत्री डॉ. अनिता, कवियत्री प्रा. डॉ. मिना सुर्वे, कवियत्री धनश्री म्हामूनकर, कवियत्री डॉ. हेमलता चौधरी, कवियत्री अस्मिता पाटील, कवि दीपक जाधव, कवि, मधुकर जाधव, कवि नाजीम पठाण हे आपल्या कवितेतून विविध सामाजिक विषयांवर प्रकाश टाकतात.
Sorry we are currently not available in your region. Alternatively you can purchase from our partners
Sorry we are currently not available in your region. Alternatively you can purchase from our partners