रोजच्या जगण्यात गोड-आंबट, तिखट-कडु गोष्टी होतच असतात. आणि त्या असायलाच हव्यात, कारण खरी मजा तर त्यातच असती. पृथ्वीतलावर जन्मास आल्या नंतर पहिला महत्वाचा टप्पा म्हंटल की आठवतं रम्य ते बालपण. पंचरसाच्या आठवणींची व पहिल्या मित्र-मैत्रिणींची जिथुन सुरुवात होते. पुढे चालून या आठवणी मुरतात त्या किशोर आणि प्रौढ वयात ! तीस-चाळीशीतून मागे वळून पाहिले की कडू आठवणी सुद्धा मजेशीर वाटायला लागतात आणि हळु-हळु व्यक्ती त्यांची शिदोरी बांधायला लागतो. मग येतं पिकलेल्याला पनाच म्हातारपण ! म्हातारपण हा केवळ त्या शिदोरीवर जगण्याचा कार्यकाळ असतो. म्हणुनच नेहमी आनंदीत रहा, कारण आनंदाचा साठा म्हातारपणात नक्कीच कामी येतो - हा साधा सोप्पा मंत्र या सप्तढंगी बुद्धीने स्पष्टं केला आहे.
Sorry we are currently not available in your region. Alternatively you can purchase from our partners
Sorry we are currently not available in your region. Alternatively you can purchase from our partners