Experience reading like never before
Sign in to continue reading.
"It was a wonderful experience interacting with you and appreciate the way you have planned and executed the whole publication process within the agreed timelines.”
Subrat SaurabhAuthor of Kuch Woh PalName : Sandesh Namdeorao Dhole Birth Date : 20/06/1966 Birth Place : Yavatmal (Maharashtra) Job : Retired Teacher, Education Department, Yavatmal (Maharashtra) Hobby : Reading books, writing poems, articles, critics of books, philosophical writing Publish Literature : Aakharich tuvhach sadan chibavin vaicharik arthamimansa Poems and articles have been published in different newspapers. Writer likes to do social work. Writer is working in literature movement in Maharashtra, Writer has participated to organise different literature programmes in Yavatmal district. Read More...
Name : Sandesh Namdeorao Dhole
Birth Date : 20/06/1966
Birth Place : Yavatmal (Maharashtra)
Job : Retired Teacher, Education Department, Yavatmal (Maharashtra)
Hobby : Reading books, writing poems, articles, critics of books, philosophical writing
Publish Literature :
Aakharich tuvhach sadan chibavin vaicharik arthamimansa
Poems and articles have been published in different newspapers.
Writer likes to do social work. Writer is working in literature movement in Maharashtra, Writer has participated to organise different literature programmes in Yavatmal district.
Read Less...
धम्मक्रांतीच्या प्रेरणेने अस्तित्वात आलेल्या आंबेडकरी साहित्याने वैश्विक साहित्यात स्वतंत्र ओळख निर्माण केली. नव्या जाणिवा, नवा आशय आणि नवे मूल्यभान असणाऱ्या या साहित्यान
धम्मक्रांतीच्या प्रेरणेने अस्तित्वात आलेल्या आंबेडकरी साहित्याने वैश्विक साहित्यात स्वतंत्र ओळख निर्माण केली. नव्या जाणिवा, नवा आशय आणि नवे मूल्यभान असणाऱ्या या साहित्याने काळावर अमीट असा ठसा उमटविला. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी प्रतिपादन केलेला सांस्कृतिक संघर्ष आंबेडकरी प्रतिभावंतांनी टोकदार केला. मूल्याधिष्ठित, स्वतंत्र आणि समतामय समाज निर्मितीसाठी आंबेडकरी कवींनी पुकारलेला एल्गार अद्वितीय होता. विषम व्यवस्थेवर प्रश्नांचे खोलवर ओरखडे उमटविणारी आंबेडकरी कविता भेदक होती, मनुष्यत्वाच्या उत्कर्षासाठी आणि पर्यायी संस्कृतीसाठी आग्रही होती. कवी संदेश ढोले यांची कविता सुद्धा याला अपवाद नाही.
समकाळ अनंत विषाक्त समस्यांनी ग्रस्त आहे. अंधारयुगाचे पुरस्कर्ते हा अंधार अधिकाधिक गडद करण्यासाठी बौद्धिकं घेत आहेत. माणूस उद्ध्वस्त करणाऱ्या नवनवीन योजनांना ते जन्म देत आहेत. अशावेळी उजेडावर प्रेम करणारी माणसं हतबल असली तरी निराश मात्र नाहीत. या मनुष्यद्रोही काळाची संदेश ढोले गंभीर समीक्षा करतात. त्यांचे सहजसुंदर शब्द कविता होऊन आपल्याशी संवाद साधतात. ढोले यांची कविता बुद्धनिष्ठ आहे. बुद्धांनी सांगितलेल्या वैश्विक मानवी मूल्यांचा ही कविता पुरस्कार करते आणि सम्यक जाणिवांना अधोरेखित करते. जगाच्या पुनर्रचनेचे सूत्र ढोले यांच्या कवितेच्या केंद्रस्थानी आहे. साहित्याच्या रणांगणात संदेश ढोले यांची तेजस्वी कविता स्वतंत्र ओळख निर्माण करेल याची खात्री आहे. त्यांच्या कवितीक जगण्याला मी मन:पूर्वक सदिच्छा देतो.
- उपराकार लक्ष्मण माने
अर्थ, आशय, तत्त्वज्ञान आणि तर्क या चार चतु:सूत्रीचा उपयोग करून 'आंबेडकरवादी कविता आकलन व अर्थमीमांसा' या समीक्षाग्रंथात पाच पुरोगामी कवी आणि त्यांच्या कवितांची समीक्षा, कविता
अर्थ, आशय, तत्त्वज्ञान आणि तर्क या चार चतु:सूत्रीचा उपयोग करून 'आंबेडकरवादी कविता आकलन व अर्थमीमांसा' या समीक्षाग्रंथात पाच पुरोगामी कवी आणि त्यांच्या कवितांची समीक्षा, कवितांचे वर्णन, विश्लेषण आणि मूल्यमापन करण्यात आले आहे. समाजातील वंचित घटकांचे वैचारिक उद्बोधन, प्रबोधन व्हावे असा मानस या ग्रंथनिर्मितीमागे आहे. मराठी साहित्यातील समीक्षाप्रांत या ग्रंथाने अधिक समृद्ध व्हावा, असाही साहित्यविषयक दृष्टिकोन या सृजनशील मूल्यमापनामागे आहे. मराठी कविता आणि सर्वच साहित्यप्रकारांची प्रचारकी नव्हे तर सखोल समीक्षा करण्याची वहिवाट या ग्रंथातून विकसित व्हावी, असाही उघड उद्देश या निर्मितीमागे आहे. समाजाची साहित्याशी, साहित्याची समाजाशी असलेली नाळ निश्चितच या नवनिर्मितीतून जुळून राहणार आहे. समाज आणि साहित्याची फारकत 'समाज आणि साहित्य' या दोहोंचीही हानी करते. दर्जेदार कलाकृती समाजाला साहित्याशी सतत बांधून ठेवत असतात. 'आंबेडकरवादी कविता आकलन व अर्थमीमांसा' या समीक्षा ग्रंथातील पाचही कलाकृती दर्जेदार आहेत. रसिक वाचकांची वाङ्मयीन अभिरुची निश्चितच हा ग्रंथ उंचावणार, यात शंका नाही. मराठी साहित्यविश्वाला अधिक जबाबदारीने पुरोगामी साहित्यनिर्मिती करण्याची प्रेरणा या ग्रंथातून नक्कीच मिळेल, अशी आशा व्यक्त केली तर ते वावगे होणार नाही. काव्यरसिक व वाचकांना प्रस्तुत ग्रंथातील 'कविता व कवितांची अर्थमीमांसा' आवडेल, असे धाडसी मत शेवटी व्यक्त केले तर ते अतिशयोक्त होणार नाही.
- संदेश ढोले
Are you sure you want to close this?
You might lose all unsaved changes.
The items in your Cart will be deleted, click ok to proceed.