You cannot edit this Postr after publishing. Are you sure you want to Publish?
Experience reading like never before
Sign in to continue reading.
"It was a wonderful experience interacting with you and appreciate the way you have planned and executed the whole publication process within the agreed timelines.”
Subrat SaurabhAuthor of Kuch Woh Palमाझ्या बँकेचा हत्येकरी कोण?
ज्याला देशाच्या अर्थव्यवस्थेचा भक्कम कणा म्हणतात, त्याच भारतीय बँकिंग क्षेत्रातील अनेक बँका अलीकडच्या काळात अशा अचानक एकापाठोपाठ एक भुईसपाट होत असल्याच्या विदारक घटना सर्वानाच बुचकळ्यात टाकणार्या असून, हे असे का घडले याचेही सखेद आश्चर्य वाटते.
उत्तम व्यवस्थापन, शिस्तबध्द प्रशासन आणि नियामकांच्या सगळ्या अटींचे काटेकोरपणे पालन करून भारतीय अर्थव्यवस्थेला सर्वोच्च स्थान मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील असणार्या बँकांपैकी काही बँकांच्या नशिबी दिवाळखोरीची लाचारी नेमकी कुणामुळे आणि कशामुळे आली असावी असाही एक प्रश्न सगळ्यांनाच भेडसावतो.
‘माझ्या बँकेचा हत्येकरी कोण?’ हे पुस्तक विविध बँकांमध्ये सर्वोच्च प्रमुखपदांवर (अर्थात C-Suite) काम केलेल्या एका तज्ज्ञ अधिकार्याने लिहिले असून, बँकांतर्गत व्यवहारांची संपूर्ण तपशीलवार आणि अचूक माहिती या पुस्तकाच्या माध्यमातून त्यांनी सर्वांसमोर सादर केली आहे. या जाणकार अधिकार्याने काही बँकांमध्ये चाललेल्या आर्थिक गैरव्यवहारांची अनेक प्रकरणे उघड केली असून ग्राहकांनाही वेळीच सावध करण्यासाठी काही मौलिक सल्ले देतानाच, अतिशय वेगळया धाटणीचा मार्गदर्शक गुणतक्ता वाचकांसमोर ठेवला आहे.
अलीकडेच उघडकीस आलेल्या आर्थिक घोटाळ्यांच्या अनेक मोठया घटनांनी देशातील अवघे बँकिंग क्षेत्र पुरते हादरले असताना आणि त्याचे गंभीर दुष्परिणाम निरपराध ग्राहकांना भोगावे लागले असतानाच, ज्यांच्या भावी सुखस्वप्नांचे आशा आकांक्षांचे जे अपरिमित नुकसान झाले होते, अशा हजारो खातेदारांच्या व्यथांचे प्रतिनिधित्व करणारे हे पुस्तक आहे.
चैतन्य
या पुस्तकाचे लेखक चैतन्य यांची जन्मभूमी आणि कर्मभूमी मुंबई असून, 1980 च्या सालादरम्यान एकीकडे मुंबई विद्यापीठाच्या पदवी परीक्षेचा अभ्यास करत असतानाच, दुसरीकडे बॅंकींगच्या क्षेत्रात पदार्पण करून आपल्या व्यावसायिक कारकीर्दीची मुहूर्तमेढसुध्दा त्यांनी रेावली होती.
आपल्या ४ दशकांच्या प्रदीर्घ कारकीर्दीत त्यांनी सार्वजनिक क्षेत्रातील काही प्रथितयश बॅंका, भारतातील विदेशी बॅंका, त्याचप्रमाणे भारतातील अग्रगण्य फिनटेक कंपन्यांमध्ये काम केले असून काही संस्थांच्या अर्थविषयक कामकाजात सहभागही दर्शवला आहे.
आपल्या कारकीर्दीत त्यांनी देशांतर्गत स्थानिक वित्तीय बाजारात सर्वसामान्यांसाठी दैनंदिन व्यवहारात उपयुक्त ठरणा-या बॅंकिंग उत्पादनांप्रमाणेच परदेशांत वास्तव्य करणा-या अनिवासी भारतीयांसाठी आर्थिक उत्पादनांचे काही नवे प्रकार प्रचलनात आणले.
बॅंकांना चांगला नफा मिळवून देण्यासाठी त्यांनी विविध संकल्पनांव्दारे खूप मदत केली. विशेषत: बॅंकेची अर्थव्यवस्था उत्त्तम, दोषरहित आणि बळकट करण्यासाठी ‘रेाबस्ट प्रोसेसेस’ अर्थात भक्कम आधुनिक कार्यपध्दती, नवी उत्पादने त्याचप्रमाणे ग्राहकांना दिलेल्या कर्जांवर मिळणारे व्याज हेच एकमेव कमाईचे साधन न ठेवता, त्याच ग्राहकांना अनेक बॅंकिंग सेवासुविधा उपलब्ध करून त्या सेवांवर सेवाशुल्काच्या आकारल्या जाणा-या माध्यमातून बॅंकेला अतिरिक्त कमाई करून देणारी ‘फी इन्कम स्ट्रीम्स’ पध्दती इत्यादी अनेक लाभदायी योजनांची ओळख त्यांनी बॅंकांना करून दिली.
सध्या ते ज्यांना आपल्या व्यवसायाच्या कार्यालयीन तसेच अंतर्गत कामकाजपध्दतीत आणि प्रक्रियेत आमूलाग्र बदल घडवून आणण्याची इच्छा आहे, अशा बॅंकांना आपल्या ग्राहकांसाठी सर्वोत्तम सेवा देण्यासाठी तसेच जागतिक स्पर्धेतही बॅंकेची पतप्रतिष्ठा उंचावण्यासाठी ‘बिझनेस प्रोसेस रि-इंजिनीअरिंग सर्व्हिसेस’ माध्यमातून अनमोल मार्गदर्शन करतात.
The items in your Cart will be deleted, click ok to proceed.