You cannot edit this Postr after publishing. Are you sure you want to Publish?
Experience reading like never before
Sign in to continue reading.
Discover and read thousands of books from independent authors across India
Visit the bookstore"It was a wonderful experience interacting with you and appreciate the way you have planned and executed the whole publication process within the agreed timelines.”
Subrat SaurabhAuthor of Kuch Woh Pal'सातत्यता'.. सातत्यता म्हणजे सतत...आपल्या मानवी मेंदूचे काम सुद्धा सतत चालू असते आणि त्यात असतात विचार.
सातत्याने येणारे विचार. न थांबता येणारे विचार. काही सकारात्मक तर काही नकोसे...खरं तर माणसाचे मन हे अफाट ताकदीचे! त्यातले विचार जर आपल्याला नीट सांभाळता आले तर जीवन जगण्याची कला फार उत्तम पध्दतीने अनुभवता येते.
मी समुपदेशन करताना वेगवेगळ्या परिस्थिती आणि अगणित प्रश्नांना सामोरे जात असतो, त्यातुन मला जाणवते ते म्हणजे प्रत्येकाच्या मनात असणारे असंख्य भाव! या भावनाच माणसाला खूप काही गोष्टी शिकवत असतात. या भावना जबरदस्त तरल आणि तेवढ्याच सक्षम असतात. भावना, विचार आणि स्व संवाद या सगळ्या एकाच नाण्याच्या बाजू..मात्र यानंतर येणाऱ्या प्रतिक्रिया ह्या प्रत्येकाच्या वेगवेगळ्या असू शकतात..या प्रतिक्रिया हाताळायला त्यांना योग्य दिशा देण्याची आवश्यकता असते.
हा कथासंग्रह सुद्धा समुपदेशन करताना मला आलेल्या अनुभव आणि त्यातल्या प्रतिक्रिया यांचे कथा स्वरूप आहे. यातले बरेच अनुभव हे आपल्याला कसे वागायचे आहे हे शिकवून जातात तर काही गोष्टी मनस्वी विचार करायला भाग पडतात.
आपल्या जीवनाचा मूळ उद्देश हा सतत आनंदी राहणे आहे हे मी मानतो आणि म्हणूनच हा उद्देश जगताना आणि काही परिस्थितीला सामोरे जाताना आपण सातत्याने योग्य प्रयत्न करणे गरजेचे असते. ही 'सातत्यता' तुम्हाला या पुस्तकात सुद्धा वाचायला मिळेल ही आशा व्यक्त करतो.
अमित मेढेकर
ट्रेनर, माईंड कोच अमित मेढेकर हे एक सर्टीफाईड काऊन्सेलर आहेत तसेच उत्तम लेखक आणि ब्लॉगर सुद्धा आहेत. त्यांनी त्यांचे MS सायकोथेरपी आणि कोन्सलिंग यामध्ये पुरे केले आहे. गेली 15 वर्षांपासून समुपदेशक आणि एक माईंड ट्रेनर म्हणून कॉर्पोरेट, आयटी, तसेच एज्युकेशन विभागात कार्यरत आहेत.
आजवर त्यांनी 60पेक्षा जास्ती डिवोर्स होण्यापासून वाचवले आहे तसेच 34 लोकांना आत्महत्या या त्यांच्या विचार आणि प्रयत्न यापासून यशस्वी रित्या परावृत्त केले आहे.
आजवर 200000 पेक्षा जास्त विद्यार्थी आणि शिक्षक यांना वर्कशॉप, सेमिनार द्वारे मार्गदर्शन केले आहे.
अनेक नामवंत कंपन्यामध्ये त्यांनी विविधी विषयावर स्टाफ, तसेच मॅनेजमेंट च्या लोकांच्या कार्यशाळा घेतल्या आहेत.
त्याच्या फर्मचे नाव हेल्दी माइंड कन्सल्टन्सी आहे.
The items in your Cart will be deleted, click ok to proceed.