You cannot edit this Postr after publishing. Are you sure you want to Publish?
Experience reading like never before
Sign in to continue reading.
"It was a wonderful experience interacting with you and appreciate the way you have planned and executed the whole publication process within the agreed timelines.”
Subrat SaurabhAuthor of Kuch Woh Pal“गावगाड्यातले माईलस्टोन” या माझ्या पहिल्या पुस्तकाला उदंड प्रतिसाद मिळाला. फेसबुकवरच्या वाचकांनी या पुस्तकाला भरभरून दाद दिली. खेड्यापाड्यातील कितीतरी लोकांनी आपल्या डोळ्यातील अश्रू ढाळत या पुस्तकाचे तोंड भरून कौतुक केले. या पुस्तकानंतरचा “गावानं केलंय मातीतून लॉगआऊट” हा माझा दुसरा कथासंग्रह.
विकासाच्या नावाखाली शहराच्या रस्त्याला गाव जोडलं गेल्यानं त्याचा झालेला परिणाम यातील बऱ्याच कथातून तुम्हांला दिसून येईल. खेड्यात राहताना लहानपणापासूनच आजूबाजूची परिस्थिती, तिथली माणसं, तिथला त्यांचा चाललेला मातीतील संघर्ष या गोष्टी आपोआप मनात घर करून बसल्या आहेत. पुढे जसजसं वाचन वाढत गेलं तसं लिखाणही आपोआप गवसत गेलं. आणि इतकी वर्षे मनाच्या कुशीत लपलेली पात्रं बाहेर येण्यासाठी उत्सुक झाली. ही सर्व पात्रं आज कथास्वरूपात तुमच्या स्वाधीन करीत आहे, त्यांचा तुम्ही स्वीकार कराल अशी आशा आहे.
ज्ञानदेव पोळ
ज्ञानदेव पोळ यांनी शिवाजी विद्यापीठातून एम.ए. ही पदवी आणि टिळक विद्यापीठ, पुणे येथून बॅचलर ऑफ जर्नालिझम ही पदवी ग्रहण केलेली आहे. त्याचबरोबर इलेक्ट्रोनिक मिडियाचेही त्यांनी शिक्षण घेतलेले आहे. त्यांनी अनेक वृत्तपत्रे, वृत्तपत्रांच्या पुरवण्या, दिवाळी अंक, साप्ताहिके, मासिके, वेबपोर्टल या माध्यमातून आजवर लेखन केलेले आहे. तसेच त्यांनी काही लघुपटाचेही लेखन केले आहे. त्यांचा 'मातीतील माणसं' हा प्रसिद्ध ब्लॉग असून २०१६ च्या एबीपी माझाच्या ब्लॉग माझा स्पर्धेत हा ब्लॉग विजेता ठरलेला आहे. तसेच ‘गावगाड्यातले माईलस्टोन’ या त्यांच्या पहिल्या पुस्तकाला महाराष्ट्र साहित्य परिषदेचा, विद्याधर पुंडलिक पुरस्कार मिळालेला आहे. ज्ञानदेव पोळ यांच्या ग्रामीण कथा फेसबुकवरच्या वाचकांमध्ये प्रचंड लोकप्रिय आहेत. त्यांच्या अनेक कथांना उदंड लोकप्रियता लाभलेली आहे.
The items in your Cart will be deleted, click ok to proceed.